
उपसंपादक :- मिलिंद जंजाळे
महाराष्ट्र शासनाच्या महसूल व वन विभागाच्या दि. १८ फेब्रुवारी २०२५ रोजीच्या शासन निर्णयानुसार गतिमान प्रशासन व आपत्कालीन व्यवस्थेचे बळकटीकरण योजनेअंतर्गत आयोजित करण्यात आलेले “छत्रपती शिवाजी महाराज महसूल समाधान शिबीर” हे शिबीर मंगळवार दि. १२ मे २०२६ रोजी शशिकांत सखाराम चौधरी कन्या शाळा, यावल येथे मोठ्या उत्साहात व नागरिकांच्या उत्स्फूर्त प्रतिसादात संपन्न झाले.
या भव्य शिबिराचे उद्घाटन मा. आमदार अमोल जावळे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी मा. तहसीलदार मोहनमाला नाझीरकर, नगराध्यक्ष छाया पाटील तसेच विविध विभागांचे अधिकारी, तालुका स्तरीय कर्मचारी, लोकप्रतिनिधी व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
शासनाच्या विविध योजना आणि महसूल विभागाच्या सेवा थेट नागरिकांपर्यंत पोहोचविण्याच्या उद्देशाने आयोजित या शिबिरामध्ये अनेक महत्त्वपूर्ण दाखले, प्रमाणपत्रे व लाभांचे प्रत्यक्ष वाटप करण्यात आले. त्यामुळे नागरिकांनी समाधान व्यक्त करत प्रशासनाच्या या उपक्रमाचे स्वागत केले.
शिबिरामध्ये देण्यात आलेले प्रमुख लाभ :
जिवंत सातबारा वाटप
एकूण वारस नोंदी – 108
प्रातिनिधिक वाटप – 28
उत्पन्न दाखले वाटप – 22
शिधापत्रिका वाटप – 12
जात प्रमाणपत्र वाटप – 54
तुकडा शेरा कमी करून सातबारा वाटप – 21
अधिवास (Domicile) व नॉन-क्रीमीलेअर प्रमाणपत्रे – 18
विशेष अर्थसाहाय योजना लाभार्थी – 45
लक्ष्मी मुक्ती सातबारा वाटप – 01
आदिवासी खातेदार नोंदी – 05
श्रवण यंत्र वाटप – 05
या शिबिरामुळे अनेक नागरिकांची वर्षानुवर्षे प्रलंबित असलेली महसूल विषयक कामे मार्गी लागल्याने नागरिकांमध्ये समाधानाचे वातावरण निर्माण झाले. प्रशासन नागरिकांच्या दारी जाऊन सेवा देत असल्याने शासनाच्या लोकाभिमुख धोरणाची प्रभावी अंमलबजावणी होत असल्याचे चित्र यावेळी पाहायला मिळाले.
कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी महसूल विभागासह सर्व संबंधित विभागांनी विशेष परिश्रम घेतले. यावल तालुक्यात आयोजित या शिबिराची नागरिकांमध्ये दिवसभर चर्चा रंगलेली दिसून आली.






