Hello Batmidar
  • Home
  • ताज्या बातम्या
  • देश-विदेश
  • जळगाव
  • धुळे
  • नंदुरबार
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • देश-विदेश
  • जळगाव
  • धुळे
  • नंदुरबार
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
Hello Batmidar
No Result
View All Result

डिझेलअभावी साकळी प्राथमिक आरोग्य केंद्राची 102 रुग्णवाहिका ठप्प गरोदर मातांची जीवाशी खेळ! जबाबदार कोण?

Editor Hello Batmidar by Editor Hello Batmidar
February 11, 2026
in आरोग्य
0

उपसंपादक :- मिलिंद जंजाळे
साकळी — ग्रामीण भागातील आरोग्य व्यवस्थेचा बोजवारा उडाल्याचे धक्कादायक चित्र साकळी येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात समोर आले आहे. गरोदर मातांसाठी अत्यंत महत्त्वाची मानली जाणारी 102 क्रमांकाची रुग्णवाहिका गेल्या महिनाभरापासून केवळ डिझेल नसल्यामुळे जागेवरच उभी असल्याची गंभीर बाब उघड झाली आहे. त्यामुळे आपत्कालीन परिस्थितीत गर्भवती महिलांना मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागत असून नागरिकांमध्ये संतापाची लाट उसळली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, रुग्णवाहिका बंद पडण्यामागचे प्रमुख कारण म्हणजे रुग्ण कल्याण समिती बंद करण्यात आल्याने आर्थिक व्यवहार ठप्प झाले आहेत. समितीचे खाते रिकामे करण्याच्या सूचनांनंतर इंधनासाठी निधी उपलब्ध नसल्याने स्थानिक पेट्रोल पंपाचे सुमारे ४० हजार रुपये थकीत असल्याचे सांगितले जात आहे. परिणामी, डिझेलअभावी रुग्णवाहिका सेवा पूर्णपणे थांबली आहे.
ही बाब अत्यंत गंभीर असताना संबंधित विभागाकडून कोणतीही तातडीची पर्यायी व्यवस्था करण्यात आलेली नाही, अशी नागरिकांची तक्रार आहे. ग्रामीण भागात खासगी वाहनांची उपलब्धता मर्यादित असते. अशावेळी शासकीय रुग्णवाहिका हीच गरोदर माता आणि गंभीर रुग्णांसाठी जीवनदायी ठरते. मात्र सध्या हीच सेवा बंद असल्याने रुग्णांच्या जीवाशी थेट खेळ सुरू असल्याचा आरोप होत आहे.
स्थानिक नागरिकांनी प्रशासनावर तीव्र नाराजी व्यक्त करत विचारले आहे की,
“शासनाच्या योजना कागदावरच आहेत का? गरोदर मातांसाठी असलेली सेवा डिझेलअभावी बंद पडते, ही अत्यंत लाजिरवाणी बाब नाही का?”
आरोग्य विभागाने तात्काळ हस्तक्षेप करून थकीत देयके अदा करावीत, रुग्णवाहिकेला तत्काळ इंधन उपलब्ध करून सेवा पूर्ववत सुरू करावी आणि या प्रकाराला जबाबदार असलेल्या यंत्रणेची चौकशी करावी, अशी जोरदार मागणी नागरिकांकडून केली जात आहे.
ग्रामीण आरोग्य व्यवस्थेतील हा हलगर्जीपणा वेळेत दुरुस्त झाला नाही तर एखादी जीवितहानी झाल्यास त्याची सर्वस्वी जबाबदारी कोण घेणार, असा संतप्त सवालही आता उपस्थित केला जात आहे.

Previous Post

शिरसाड येथे किनगाव श्री क्षेत्र मुक्ताई पायी दिंडीचे जल्लोषात स्वागत  तहसीलदार मोहनमाला नाझीरकर यांच्या हस्ते पूजन, महाप्रसादाने भक्तिमय वातावरण

Next Post

नगरमध्ये तरुणाचे अपहरण करून बेदम मारहाण; भरवस्तीत चोरीचा धुमाकूळ,

Next Post

नगरमध्ये तरुणाचे अपहरण करून बेदम मारहाण; भरवस्तीत चोरीचा धुमाकूळ,

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

तुकाराम मुडे यांची पुन्हा बदली; 29 वर्षात 24 बदली

April 1, 2026

यावलमध्ये ACB ची धडक कारवाई : वनरक्षकावर लाच मागणीचा गुन्हा, वनविभागातील भ्रष्टाचार उघड

March 31, 2026

जिल्ह्यासाठी ‘ऑरेंज’ व ‘येलो’ अलर्ट; नागरिकांना सतर्कतेचे आवाहन

March 30, 2026

संजय बाचकर सरांचा वाढदिवस शाळेमध्ये मोठ्या उत्साहात साजराहॅलो बातमीदार

March 30, 2026

भोंदूबाबा अशोक खरातच्या पोलिस कोठडीत 1 एप्रिलपर्यंत वाढ

March 30, 2026

स्वयंघोषित धर्मगुरू ऋषिकेश वैद्यला 6 एप्रिलपर्यंत पोलिस कोठडी

March 29, 2026
Hello Batmidar

© 2025 Powered by ContentOcean Infotech..

No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • देश-विदेश
  • जळगाव
  • धुळे
  • नंदुरबार
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • सामाजिक

© 2025 Powered by ContentOcean Infotech..