
उपसंपादक :- मिलिंद जंजाळे
डी.एन. कॉलेज फैजपूर येथे सुरू असलेल्या इयत्ता १२ वीच्या परीक्षेदरम्यान कॉपीमुक्त वातावरण राखण्यासाठी शिक्षण विभागाने विशेष बैठे पथक नियुक्त केले होते. मात्र परीक्षेच्या संवेदनशील काळातच बैठे पथकातील एका कर्मचाऱ्याची अचानक दुसऱ्या केंद्रावर ड्युटी बदलण्यात आल्याने मोठा वाद निर्माण झाला आहे.
कॉपी रोखण्यासाठी नेमलेले पथकच कमजोर करण्याचा गट शिक्षण अधिकारी यांचा प्रयत्न तर नाही ना? असा सवाल आता विद्यार्थी, पालक आणि नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे. परीक्षेच्या मध्यावरच कर्मचाऱ्याची नियुक्ती मध्ये बदल झाल्याने निर्णयामागील कारणांबाबत संशय व्यक्त होत आहे.
स्थानिक पातळीवर अशी चर्चा रंगली आहे की, काही दबावाखाली येऊन किंवा “चिरीमिरी”च्या माध्यमातून हा निर्णय घेतला गेला का? गट शिक्षण अधिकाऱ्यांनी अचानक ड्युटी बदलण्यामागील ठोस कारण स्पष्ट न केल्याने संशय अधिकच बळावत आहे.
परीक्षा काळात अशा प्रकारची नियुक्तीत बदल झाल्यामुळे कॉपीमुक्त मोहिमेवर परिणाम होऊ शकतो, असे शिक्षण क्षेत्रातील जाणकारांचे मत आहे. पारदर्शकतेचा अभाव आणि संवेदनशील काळातील निर्णयामुळे प्रशासनाच्या व गट शिक्षण अधिकारी यावल. यांच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
नागरिकांनी या प्रकरणाची सखोल चौकशी करून जबाबदार गट शिक्षण अधिकारी यावल यांच्यावर कारवाई करण्याची मागणी केली जात आहे. तसेच परीक्षांमध्ये कोणत्याही प्रकारचा हस्तक्षेप होऊ नये आणि कॉपीमुक्त वातावरण कायम राहावे, यासाठी शिक्षण विभागाने स्पष्ट भूमिका मांडावी, अशी मागणी होत आहे.
आता प्रश्न असा — परीक्षेच्या काळात अचानक नियुक्ती बदलण्यामागे नेमके कारण काय?
दबाव, शिफारस की आर्थिक व्यवहार झाला आहे का ?
याचे उत्तर शिक्षण विभाग देणार का — याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.







