
अहिल्यानगर (प्रशांत बाफना):- जिल्हा पोलीस दलातील ३३ पोलिस नाईक यांना पोलिस हवालदारपदी पदोन्नती देण्यात आली आहे. जिल्हा पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांनी याबाबतचा आदेश बुधवारी (१८ फेब्रुवारी) काढला. पदोन्नती मिळालेल्या अमलदारांमध्ये आनंदाचे वातावरण असून, शासन निर्णयान्वये अटी व शर्तींची पूर्तता केल्यानंतर ही बढती देण्यात आली आहे.
पदोन्नती मिळालेले पोलिस अमलदार व नियुक्तीचे ठिकाण
अविनाश वाकचौरे (कोतवाली), अशोक पवार (शिर्डी), संदीप गायकवाड (आर्थिक गुन्हे शाखा), भास्कर गायकवाड (मिरजगाव), अनिता खताळ (अकोले), मिराबाई बिबवे (संगमनेर शहर), राम लहामगे (अकोले), सुनील निकम (राहुरी), सागर सदाफळ (कोपरगाव), सविता उंदरे (श्रीरामपूर शहर), सुरेखा वलवे (बेलवंडी), शाहिद शेख (भिंगार कॅम्प), अविनाश ढेरे (अहिल्यानगर तालुका), दत्तू चौधरी (धारगाव), गोकुळ इंगवले (श्रीगोंदा), तन्वीर शेख (तोफखाना), जावेद शेख (वाहतूक शाखा, अहिल्यानगर), अल्ताफ शेख (पाथर्डी), सोमनाथ झांबरे (एलसीबी), किशोर औताडे (श्रीरामपूर शहर), काकासाहेब मोरे (श्रीरामपूर तालुका), गणेश झांबे (मिरजगाव), संदीप दरंदले (श्रीरामपूर शहर), प्रविण बागुल (राहुरी), शहानवाज शेख (पोलीस मुख्यालय), भागवत शिंदे (श्रीरामपूर शहर), संतोष सावळे (कर्जत), किरण पवार (नेवासा), बाळासाहेब नागरगोजे (सायबर), मैनाबाई माळी (महिला तक्रार निवारण शाखा), स्वाती ढवळे (नागरी हक्क संरक्षण), रोहिणी वाडेकर (राजूर), सुजाता थोरात (संगमनेर शहर).जिल्हा पोलीस दलाच्या आस्थापनेवरील या पदोन्नतीमुळे दलात नवचैतन्य निर्माण झाले असून, पदोन्नत झालेल्या सर्व अमलदारांचे विविध मान्यवरांनी अभिनंदन केले आहे.







