
अहिल्यानगर/प्रशांत बाफना
गेल्या महिना भरापासून खाद्यतेलाच्या दरात सातत्याने वाढ होत असल्याने सर्वसामान्यांचे बजेट कोलमडले आहे आंतरराष्ट्रीय घडामोडी व पुरवठ्यातील अडचणीमुळे सोयाबीन व सूर्यफूल पामतेल व शेंगदाणा तेलाच्या दरात १५ ते २५ टक्क्यांनी वाढ झाली आहे दरवाढी बरोबर कंपन्यांनी पॅकेट चे वजन कमी केल्याने ग्राहकांना दुहेरी फटका बसत आहे याचा आर्थिक परिणाम मात्र ग्रामीण भागातील शेतकरी व शेतमजूर यांना बसत आहे पूर्वी १ लिटरच्या नावाखाली मिळणारे तेल आता ८०० ते ८५० लिटरपर्यंत कमी करण्यात आले आहे काय ठिकाणी ७०० मिली लिटर पैकी ही बाजारात दिसत आहे किमत कायम ठेवून वजन घटवल्याने ग्राहकांची दिशाभूल होत असल्याची चर्चा जनसामान्यात होत आहे महिन्याभरापूर्वी १५ किलोचा डबा २१०० रुपया पर्यंत मिळत होता तो आता २५०० ते २६०० रुपयावर गेला आहे या वाढीचा फटका गृहिणी हॉटेल व्यावसायिक व मेस चालकांना बसत आहे जागतिक तणावामुळे पुरवठा व साखळी विस्कळीत झाली आहे त्यामुळे दर वाढ झाल्याचे चित्र ग्रामीण भागात दिसून येत आहे सामान्य जनतेला मात्र महागाईचा फटका बसत आहे ग्रामीण भागात आर्थिक वर्ग हा शेतकरी व शेतमजूर असल्यामुळे कुठले तेल किती वजनाचे आहे याची शहानिशा केली जात नाही वाढीव भाव हे कुठल्याही नियमावली शिवाय लावल्या जात आहे ग्रामीण भागात अन्न औषधी प्रशासनाकडून एकही कारवाई या बाबत झाली नाही शिवाय भेसळयुक्त व खुल्या तेलामुळे आरोग्याचा प्रश्न मोठ्या प्रमाणात निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही कपन्याकडून पॅकेट चे वजन कमी करण्याच्या प्रकारावर वजन माप मापे विभागाचे नियंत्रण आहे का असे प्रश्न उपस्थित होत आहेत या प्रकारावर आळा घालण्यासाठी प्रशासनाने तातडीने कारवाई करावी अशी मागणी नागरीकातून होत आहे सध्या वाढत्या महागाईमुळे गोरगरिबांचे कंबरटेच मोडले आहे






