Hello Batmidar
  • Home
  • ताज्या बातम्या
  • देश-विदेश
  • जळगाव
  • धुळे
  • नंदुरबार
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • देश-विदेश
  • जळगाव
  • धुळे
  • नंदुरबार
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
Hello Batmidar
No Result
View All Result

इचखेडा मार्गावरील खालकोट वनक्षेत्रात मोठ्या प्रमाणात वृक्षतोड? वन अधिकाऱ्यांच्या भूमिकेवर गंभीर प्रश्नचिन्ह, चौकशीची मागणी तीव्र

Editor Hello Batmidar by Editor Hello Batmidar
February 8, 2026
in क्राईम
0

उपसंपादक:-मिलिंद जंजाळे
यावल पश्चिम व पूर्व विभागाच्या वनक्षेत्रात येणाऱ्या इचखेडा मार्गावरील खालकोट वनराई परिसरात मोठ्या प्रमाणावर सागवानासह इतर मौल्यवान वृक्षांची तोड सुरू असल्याचा गंभीर आरोप स्थानिक नागरिक व पर्यावरणप्रेमींनी केला आहे. या कथित वृक्षतोडीमुळे संपूर्ण परिसरात खळबळ उडाली असून वन विभागाच्या अधिकाऱ्यांच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे.
स्थानिकांच्या म्हणण्यानुसार, जंगल संवर्धनाच्या नावाखालीच जंगल साफ करण्याचा प्रकार सुरू असून रात्रीच्या वेळी व दुर्गम भागात मोठ्या प्रमाणावर वृक्षतोड होत असल्याचे दिसून येत आहे. सागवानासारख्या मौल्यवान वृक्षांवर कुरघोडी केली जात असून लाकूड माफियांचा वावर वाढल्याची चर्चा परिसरात सुरू आहे.
नागरिकांचा आरोप आहे की, संबंधित विभागाकडे वारंवार तक्रारी करूनही ठोस कारवाई होताना दिसत नाही. त्यामुळे “ही वृक्षतोड नेमकी कोणाच्या छत्रछायेखाली सुरू आहे?” असा संतप्त सवाल उपस्थित केला जात आहे. काही सामाजिक कार्यकर्त्यांनी तर या प्रकरणात वन विभागातील जबाबदार अधिकाऱ्यांची चौकशी करून त्यांची संपत्ती व कामकाज तपासण्याची मागणी केली आहे.
पर्यावरण तज्ज्ञांच्या मते, या भागातील वनराई ही स्थानिक हवामान, भूजल पातळी आणि जैवविविधतेसाठी अत्यंत महत्त्वाची आहे. अशा पद्धतीने अंधाधुंद वृक्षतोड सुरू राहिल्यास भविष्यात दुष्काळ, मृदस्खलन व वन्यजीवांचा ऱ्हास यासारखे गंभीर परिणाम भोगावे लागू शकतात.
दरम्यान, नागरिकांनी जिल्हाधिकारी व वरिष्ठ वनसंरक्षक यांनी तात्काळ घटनास्थळी पाहणी करून स्वतंत्र चौकशी समिती नेमावी, दोषींवर गुन्हे दाखल करावेत आणि सुरू असलेली कथित वृक्षतोड त्वरित थांबवावी, अशी जोरदार मागणी केली आहे.
या प्रकरणी वन विभागाकडून अधिकृत भूमिका समोर येणे अपेक्षित आहे.

Previous Post

अजितदादांच्या विमानात बॉम्ब होता का?, खासदार बजरंग सोनवणेंच्या दाव्याने खळबळ

Next Post

मुख्यालय सोडून ‘अपडाऊन’वर वन अधिकारी-वनपाल?जंगल सुरक्षा धोक्यात, नागरिकांमध्ये संताप

Next Post

मुख्यालय सोडून ‘अपडाऊन’वर वन अधिकारी-वनपाल?जंगल सुरक्षा धोक्यात, नागरिकांमध्ये संताप

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

महावितरण कंपनीच्या बेजबाबदारपणामुळे कंटाळवाणं लोडशेडिंग…! सायंकाळी होतोय डासांचं प्रचंड सुळसुळाट…! सकाळच्याऐवजी संध्याकाळी वीजपुरवठा सुरु करण्याची मागणी…!

March 26, 2026

सावदा येथील सरकारी दूध डेअरीत पोलिसांचा मोठा छापा; दुधाच्या आड सुरू असलेली दारूची तस्करी उघड

March 26, 2026

किनगाव आरोग्य व्यवस्थेचा बोजवारा; दोन गरोदर मातांना एकाच बेडवर उपचार! प्रशासन झोपेत?

March 25, 2026

रावेर–यावल तालुक्यात भोंदू बाबा अशोक खरातचे ‘कनेक्शन’ ? अधिकाऱ्यांपासून नागरिकांपर्यंत चर्चेला उधाण

March 25, 2026

अवैध वृक्षतोडीला पाठीशी कोण? यावलमध्ये आंदोलनाची घोषणा

March 24, 2026

परसाळे बुद्रुक येथे १२ एप्रिल रोजी आदिवासी तडवी भिल्ल समाजाचा सामूहिक विवाह आयोजन

March 24, 2026
Hello Batmidar

© 2025 Powered by ContentOcean Infotech..

No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • देश-विदेश
  • जळगाव
  • धुळे
  • नंदुरबार
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • सामाजिक

© 2025 Powered by ContentOcean Infotech..