
उपसंपादक:-मिलिंद जंजाळे
शांततेसाठी ओळखल्या जाणाऱ्या यावल शहरात निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकारणाला गुंडांची जोड मिळाल्याचा गंभीर आरोप समोर आला आहे. मतदानाच्या दिवशी एका मोठ्या राजकीय पक्षाने बाहेरून आणलेल्या मनुष्यबळामुळे शहराचे वातावरण ढवळून निघाले.
आणि आता याच गटातील काही चेहरे तुषार तायडे हल्ला/मृत्यू प्रकरणाशी संदर्भात चर्चेत आल्याने यावलमध्ये संतापाची लाट उसळली आहे.

स्थानिक नागरिकांचा सवाल —
“निवडणुकीत गुंड मागवायचे कोणासाठी? आणि हेच चेहरे नंतर गंभीर गुन्ह्यांत कसे दिसतात?”
शहरात चर्चेचा विषय असा की, निवडणूक काळात आणलेल्या काही संशयितांची नावं तुषार तायडे प्रकरणातील तपासात फिरत असल्याची चर्चा वेगाने पसरली आहे. यामुळे नागरिकांमध्ये भीती आणि संताप दोन्ही वाढले आहेत.
निवडणूक की दहशत?
मतदानाचा दिवस म्हणजे लोकशाहीचा उत्सव… पण यावलमध्ये मात्र परिस्थिती वेगळीच दिसली. राजकीय शक्तीच्या जोरावर बाहेरून दाखल झालेल्या गटांनी शहरात दहशतीचे वातावरण निर्माण केल्याची जोरदार चर्चा होती.
नागरिकांचा थेट आरोप —
“यावलमध्ये कधीही न दिसणारे चेहरे, दहा-दहा जणांच्या टोळ्या, आणि गल्लोगल्ली फिरणारी संशयास्पद वाहने… हे निवडणूक असते की रणांगण?”
तुषार तायडे प्रकरणाने राजकारणात खळबळ
तुषार तायडे यांच्यावर झालेल्या हल्ल्याने संपूर्ण जिल्हा हादरला. आता त्याच घटनेशी कनेक्ट होणारा “निवडणुकीतील गुंड” हा मुद्दा राजकारणात वादळ निर्माण करू लागला आहे.
जनता सवाल करते—
“ज्यांना शहरातील नागरिक ओळखतही नाही, असे बाहेरचे लोक इथे का आणले गेले? आणि त्यांचा छुपा अजेंडा काय?”
लोकशाहीचा अपमान – यावलकरांचा संताप उफाळला
यावलमध्ये शांतता आणि सौहार्दाचे वातावरण नेहमीच टिकले. पण निवडणूक जिंकण्यासाठी गुंडांचा आधार घेणारे नेमके काय संदेश देतात?
यावलकरांचा आवाज बुलंद —
“आमदार असो, मंत्री असो… निवडणूक जिंकण्यासाठी गुंडांची गरज पडत असेल, तर ते लोकशाही नव्हे तर गुंडशाही आहे!”







