
उपसंपादक मन्सूर तडवी
यावल.हरिपुरा येथे दि.१७/५/२६ रोजी संध्याकाळी पाच वाजेपासून तर दहा वाजेपर्यंत आदिवासी तडवी भिल्ल जमातीची महापंचायतची मीटिंग आयोजित केली होती या आदिवासी (मीटिंग) मेळाव्यात कोणतेही व्यासपीठ किंवा स्टेज खुर्च्या नव्हत्या एकदम साध्यापणाने मी नाही तर आपण असे सर्वच आदिवासीं समाज बांधव यांचे प्रतीक दिसून आले आजी-माजी राजकीय पुढारी अधिकारी वर्ग सर्व सामान्य माणूस सर्वांनी खालीच बसू असा एकच सूर सर्वांचे मुखाने निघत गेला
या सभेमध्ये रावेर, चोपडा,यावल जळगाव भुसावळ, पुणे, नाशिक, मुंबई. बुलढाणा आणि कोकण येथून समाजातील बहुसंख्येने समाज बांधवांची उपस्थिती दिसून येत होती आदिवासी तडवी भिल समाज महापंचायतचे मुख्य उद्दिष्ट पुढील प्रमाणे
१)तडवी भिल समाजात गावोगावी एकता निर्माण करणे.
२)शिक्षणाचा प्रसार व विद्यार्थ्यांना मदत करणे.
३)समाजातील युवकांना रोजगार व व्यवसाय मार्गदर्शन करणे
४)महिलांचे सक्षमीकरण व स्वावलंबन करणे
५)समाजातील वाईट प्रथा, व्यसन व अंधश्रद्धा कमी करणे.
६)शासनाच्या योजना घरोघरी जाऊन समाजापर्यंत पोहोचवणे.
७) आदिवासी समाजाची संस्कृती, भाषा व परंपरा जतन करणे.
८)सामाजिक, शैक्षणिक व आरोग्यविषयक उपक्रम राबवणे.
९) गावोगावी समाजातील तंटे संवादाने मिटविणे.
१०)संविधानिक हक्कांसाठी शांततामय लढा उभारणे.
११) नव्यानेच निर्माण झालेल्या समाजातील काही रूढी बंद करणे उदा. यात्रा संदल मध्ये दहा ते बारा बँड वाजे यावर विचार करणे. लग्नांमध्ये पैशाची उधळण पट्टी आणि वेळेवर लग्न लागणे
१२) लग्नपत्रिका ही आता लांबच्या अंतरावर काही गावे शहरांमध्ये व्हाट्सअप वर लग्नपत्रिका स्वीकार करणे
१४) २०२६,२७ या वर्षी होत असलेल्या जनगणने विषयी मार्गदर्शन चर्चा करणे. इत्यादी महापंचायत ची उद्दिष्टे आहेत.
सर्व समाजबांधवांनी एकमताने, महापंचायत व्हावी अशी इच्छा व्यक्त केली होती समाजातील ज्येष्ठ नेते यांनी आपली मते परखडपणे मांडली. काही समाज सेवकांना वेळेअभावी आपली मते मांडता आली नाही. परंतु समाजा विषयी त्यांची तळमळ दिसून आली.
होतकरू तरुण आणि दिर्घकाळ समाजसेवा केलेल्या समाजसेवक या सर्वांनी महापंचायत मध्ये स्वतःहुन काम करण्याची इच्छा व्यक्त केली आहे. जवळपास ६० पेक्षा अधिक लोकांनी आपली नावे नोंदवली आहेत. अजूनही नावे येण्याची शक्यता आहे.
यातील प्रत्येक गावात गांवपंचायत,तालुका पंचायत जिल्हा पंचायत अशी रचना केली जाणार आहे. प्रत्येक घटकाचा विचार केला जाणार आहे. वेळेअभावी काही गोष्टी राहून गेल्या असतीलही. प्रत्येकाचे १०० टक्के समाधानही होणे अपेक्षित होते. पण थोडेफार राहून गेले. पण चांगले घडण्यासाठी, घडवण्यासाठी मुहूर्तमेढ झाली आहे.
यातच आनंद आहे.
या सभेसाठी खूप लोकांनी आर्थिक सहकार्य केले. सभामंडप, सरबत पाणी, स्पिकर व्यवस्था या सहकार्य करणारे हरिपूरा येथील बांधवांची तळमळ दिसून आली.







