Hello Batmidar
  • Home
  • ताज्या बातम्या
  • देश-विदेश
  • जळगाव
  • धुळे
  • नंदुरबार
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • देश-विदेश
  • जळगाव
  • धुळे
  • नंदुरबार
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
Hello Batmidar
No Result
View All Result

शेतकऱ्यांच्या शेतात उभे केले विजेचे खांब, पण भरपाई मात्र गायब!महावितरणच्या दिरंगाईमुळे शेतकऱ्यांवर अन्याय नुकसान कोण भरून देणार?

Editor Hello Batmidar by Editor Hello Batmidar
December 16, 2025
in शासकीय
0

उपसंपादक:-मिलिंद जंजाळे
शेतकऱ्यांचे शेत म्हणजे त्यांची उपजीविका, पण त्याच शेतात विज महावितरण विभागाने थेट विजेचे खांब उभारले आणि त्याबदल्यात देय असलेली भरपाई आजतागायत शेतकऱ्यांना मिळालेली नाही, हे अत्यंत धक्कादायक वास्तव समोर आले आहे.
महावितरणकडून वीजपुरवठा सुधारण्याच्या नावाखाली अनेक शेतकऱ्यांच्या शेतजमिनीमध्ये परवानगीशिवाय किंवा तुटपुंज्या आश्वासनांवर खांब, तार व ट्रान्सफॉर्मर बसवण्यात आले. मात्र त्यानंतर शेतकऱ्यांनी केलेल्या पाठपुराव्यालाही विभागाकडून केराची टोपली दाखवली जात आहे. शेतीचे नुकसान, उत्पन्नात घट — जबाबदार कोण
विजेचे खांब उभारल्यामुळे
लागवडीखालील क्षेत्र कमी झाले
नांगरणी, पेरणी व काढणीस अडथळे निर्माण झाले पिकांचे थेट आर्थिक नुकसान झाले
असे असतानाही भरपाईचे प्रस्ताव फक्त कागदावरच फिरत आहेत. शेतकरी वर्षानुवर्षे चकरा मारत असताना महावितरणचे अधिकारी मात्र बघ्याची भूमिका घेत आहेत.
भरपाई द्यायची जबाबदारी कुणाची?
शासन नियमांनुसार खासगी शेतजमिनीत खांब उभारल्यास शेतकऱ्यांना योग्य मोबदला देणे बंधनकारक आहे.
मग प्रश्न असा आहे की,
महावितरण नियमांपेक्षा वर आहे का?
शेतकऱ्यांची जमीन मोफत वापरण्याचा अधिकार कुणी दिला?
भरपाई न देण्यामागे आर्थिक गैरव्यवहार आहे का?
** शेतकऱ्यांचा संताप उसळण्याच्या मार्गावर**
दीर्घकाळापासून न्याय न मिळाल्याने शेतकऱ्यांमध्ये तीव्र असंतोष पसरला आहे.
जर तात्काळ भरपाई देण्यात आली नाही तर महावितरण कार्यालयासमोर आंदोलन, कामबंद आंदोलन व कायदेशीर लढा उभारण्याचा इशारा शेतकरी देत आहेत.
प्रशासनाला थेट सवाल
शेतकऱ्यांच्या शेतात खांब उभारून
“वीज सर्वांसाठी” म्हणणाऱ्या महावितरणने शेतकऱ्यांवर अन्याय का केला?
शासन व लोकप्रतिनिधींनी याकडे गांभीर्याने लक्ष देऊन
तात्काळ भरपाई देण्याचे आदेश द्यावेत,
अशी जोरदार मागणी शेतकरी करत आहेत.

Previous Post

जळगाव जिल्ह्यात घरकुल योजना ठप्प – लाभार्थी वाऱ्यावर, जबाबदार कोण?

Next Post

इंजिनीयर पांडुरंग शेलार यांना इन्सपायरिंग इंडियन पुरस्कार प्रधान,

Next Post

इंजिनीयर पांडुरंग शेलार यांना इन्सपायरिंग इंडियन पुरस्कार प्रधान,

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

परसाडे येथे आदिवासी तडवी- भिल समाजाचा सामुहिक विवाह सोहळा संपन्न

April 16, 2026

सूर्य कोपला, महाराष्ट्र तापला, पुढील काही दिवस उष्णतेची लाट…मुंबईत ३५ तर अहिल्यानगर, नागपूरमध्ये ४१ अंश तापमान

April 16, 2026

राहुरी विधानसभा मतदारसंघामध्ये मनाई आदेश जारी;जिल्हाधिकारी डॉ. पंकज आशिया म्हणाले….

April 16, 2026

साकळी येथे विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची 135 वी जयंती उत्साहात साजरी

April 15, 2026

शेठ ला. ना. सा.विद्यालयात विश्वरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी जळगाव येथील शिक्षण प्रसारक मंडळ संचालित शेठ ला.ना. सा.विद्यालयातील भैय्यासाहेब गंधे सभागृहात

April 15, 2026

कासोद्यात पोलिसांची धडाकेबाज कामगिरी ‘ऑपरेशन हातभट्टी १२०० लिटर अवैध दारू रसायनाचा जागेवरच केला नाश.

April 12, 2026
Hello Batmidar

© 2025 Powered by ContentOcean Infotech..

No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • देश-विदेश
  • जळगाव
  • धुळे
  • नंदुरबार
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • सामाजिक

© 2025 Powered by ContentOcean Infotech..