Hello Batmidar
  • Home
  • ताज्या बातम्या
  • देश-विदेश
  • जळगाव
  • धुळे
  • नंदुरबार
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • देश-विदेश
  • जळगाव
  • धुळे
  • नंदुरबार
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
Hello Batmidar
No Result
View All Result

पाणीटंचाईच्या प्रश्नाकडे लक्ष वेधण्यासाठी मुख्यमंत्र्यांना निवेदनलाडजळगाव परिसरातील पाझरतलाव दुरुस्ती व गोळेगाव तलावाच्या मध्यम प्रकल्पाची मागणी

Editor Hello Batmidar by Editor Hello Batmidar
May 9, 2026
in शासकीय
0

अहिल्यानगर/ प्रशांत बाफना
: शेवगाव तालुक्यातील लाडजळगाव येथील नागरिक तथा शेतकरी प्रतिनिधी प्रमोदकुमार ताराचंद छाजेड यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना इमेलद्वारे निवेदन देत धनगर वस्ती व कोकटवाडी येथील पाझरतलाव दुरुस्तीची मागणी केली आहे. तसेच गोळेगाव येथील तलावाचे मध्यम प्रकल्पात रूपांतर करण्याचीही मागणी करण्यात आली आहे.
निवेदनात म्हटले आहे की, शेवगाव तालुक्याच्या पूर्व भागात कायमस्वरूपी पाण्याचा स्रोत नसल्याने शेतकरी बांधवांचे जीवन पूर्णपणे पावसावर अवलंबून आहे. पाऊस वेळेवर व चांगला झाल्यास खरीप पिकातूनच शेतकऱ्यांची गुजराण होत असते. मात्र पाणीटंचाईमुळे दरवर्षी शेती आणि जनजीवनावर परिणाम होत आहे.
धनगर वस्ती व कोकटवाडी येथील पाझरतलावांचे खोलीकरण, गाळ काढणे तसेच भिंतींमधून होणारा पाझर थांबविण्याची कामे झाल्यास परिसरातील विहिरींना अधिक काळ पाणी उपलब्ध राहू शकते. त्यामुळे शेतकरी, पशुपालक व ग्रामस्थांना मोठा दिलासा मिळेल, असे निवेदनात नमूद करण्यात आले आहे.
यासोबतच गोळेगाव येथील सुमारे ५० वर्षांपूर्वी बांधण्यात आलेल्या तलावाच्या दोन्ही बाजूंना डोंगररांग असल्याने पाणी साठवण क्षमता वाढविण्यास मोठी संधी असल्याचे सांगण्यात आले आहे. शासनाने या तलावाचे मध्यम प्रकल्पात रूपांतर केल्यास आसपासच्या १५ ते २० गावांना याचा मोठा फायदा होऊ शकतो, असा विश्वास व्यक्त करण्यात आला आहे.
शेवगाव तालुक्याचा पूर्व भाग हा पाणी व विकासाच्या बाबतीत दीर्घकाळ उपेक्षित राहिल्याची खंत व्यक्त करत मुख्यमंत्र्यांनी या मागण्यांकडे गांभीर्याने लक्ष देऊन संबंधित विभागामार्फत तातडीने कार्यवाही करावी, अशी मागणी प्रमोदकुमार छाजेड यांनी केली आहे.
चौकट“काम फक्त कागदावरच; तक्रारीनंतरही प्रशासनाकडून दखल नाही” – प्रमोदकुमार छाजेड
शेवगाव तालुक्यातील लाड जळगाव येथील धनगरवस्ती पाझरतलावाच्या खोलीकरण कामात भ्रष्टाचार झाल्याचा गंभीर आरोप नागरिक तथा शेतकरी प्रतिनिधी प्रमोदकुमार ताराचंद छाजेड यांनी केला आहे. मागील वर्षी तलावाचे खोलीकरण झाल्याचे दाखविण्यात आले, मात्र प्रत्यक्षात कोणतेही काम झाले नसून सर्व प्रकार केवळ कागदोपत्रीच झाल्याचा आरोप त्यांनी केला आहे.
“धनगरवस्ती येथील पाझरतलावाचे मागील वर्षी खोलीकरण फक्त कागदावरच झाले आहे. तहसीलदार, गटविकास अधिकारी यांना अर्ज करूनही काहीही उपयोग झालेला नाही. अधिकाऱ्यांचा या भ्रष्टाचाराला सुप्त पाठिंबा असल्याने भ्रष्टाचार वाढत आहे,” असा आरोप प्रमोदकुमार छाजेड यांनी केला आहे

Previous Post

पाथर्डी शहरात बोगस डॉक्टरवर गुन्हा दाखल

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

पाणीटंचाईच्या प्रश्नाकडे लक्ष वेधण्यासाठी मुख्यमंत्र्यांना निवेदनलाडजळगाव परिसरातील पाझरतलाव दुरुस्ती व गोळेगाव तलावाच्या मध्यम प्रकल्पाची मागणी

May 9, 2026

पाथर्डी शहरात बोगस डॉक्टरवर गुन्हा दाखल

May 9, 2026

बीड पॅटर्नची पुनरावृत्ती जळगावात?भूसंपादन घोटाळ्याप्रकरणी मनपा वकील, जागामालकांवरही फौजदारी कारवाईची मागणी

May 8, 2026

भूसंपादन घोटाळ्यात जिल्हाधिकारी अविनाश पाठक यांना अटक

May 8, 2026

भुसावळात शिवसेनेचा इशारा; नसरापूर-केज अत्याचार प्रकरणी दोषींना फाशीची शिक्षा द्या!

May 8, 2026

कारागृहातून कायमचं बाहेर पडण्यासाठी वाल्मिक कराड, विष्णू चाटेची धडपड; उच्च न्यायालयात दोषारोपपत्र रद्द करण्याच्या मागणीचा अर्ज

May 8, 2026
Hello Batmidar

© 2025 Powered by ContentOcean Infotech..

No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • देश-विदेश
  • जळगाव
  • धुळे
  • नंदुरबार
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • सामाजिक

© 2025 Powered by ContentOcean Infotech..