Hello Batmidar
  • Home
  • ताज्या बातम्या
  • देश-विदेश
  • जळगाव
  • धुळे
  • नंदुरबार
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • देश-विदेश
  • जळगाव
  • धुळे
  • नंदुरबार
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
Hello Batmidar
No Result
View All Result

हिंगोणा गावातील निकृष्ट रस्त्यांच्या कामाबाबत तक्रार; अभियंत्याच्या चौकशीची मागणी आमदार अमोल जावळे यांनी लक्ष देण्याची गरज

Editor Hello Batmidar by Editor Hello Batmidar
February 17, 2026
in शासकीय
0

उपसंपादक :-मिलिंद जंजाळे
यावल तालुक्यातील हिंगोणा येथे आमदार निधीतून करण्यात आलेल्या डांबरीकरणाच्या कामावरून प्रश्न निर्माण झाला असून या कामाच्या गुणवत्तेबाबत गंभीर तक्रार दाखल करण्यात आली आहे. रावेर-यावल मतदारसंघाचे लोकप्रिय आमदार अमोल जावळे यांच्या प्रयत्नातून तालुक्यात विविध विकासकामांना गती मिळाली आहे. हिंगोणा येथील हटकर कॉलनी तसेच गावांतर्गत डांबरीकरणाचे रस्ते हे त्याच विकासदृष्टीचा भाग म्हणून मंजूर करण्यात आले होते.
मात्र सदर रस्त्यांचे काम अतिशय निकृष्ट दर्जाचे झाल्याचा आरोप सामाजिक कार्यकर्ते हर्षल आंबेकर यांनी केला आहे. दिनांक 30 रोजी त्यांनी मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद जळगाव, तसेच बांधकाम विभागाचे संबंधित अधिकारी आणि पंचायत समिती यावल येथील गटविकास अधिकाऱ्यांची प्रत्यक्ष भेट घेऊन लेखी तक्रार सादर केली.
तक्रारीत नमूद करण्यात आले आहे की, आमदार अमोल जावळे यांच्या माध्यमातून यावल तालुक्यात भरघोस विकासकामे होत असताना हिंगोणा येथे झालेल्या डांबरीकरणाच्या कामात दर्जाबाबत गंभीर त्रुटी आढळून येत आहेत. संबंधित अभियंता रवींद्र इंगळे यांना वेळोवेळी कामाबाबत माहिती देण्यात आली, तसेच निकृष्ट कामाचे फोटो व व्हिडिओ व्हॉट्सअ‍ॅपवर पाठविण्यात आले. तरीदेखील त्यांनी प्रत्यक्ष स्थळी भेट दिलेली नाही, असा आरोप तक्रारीत करण्यात आला आहे.
तसेच पंधरा दिवस उलटूनही तक्रारीची दखल घेण्यात आलेली नसल्याने संबंधित अभियंता रवींद्र इंगळे यांची वरिष्ठ स्तरावरून सखोल चौकशी करण्यात यावी व दोषी आढळल्यास शिस्तभंगाची कारवाई करण्यात यावी, अशी मागणी करण्यात आली आहे.
दरम्यान, आमदार अमोल जावळे यांच्या नेतृत्वाखाली मतदारसंघात सुरू असलेल्या विकासकामांची गुणवत्ता अबाधित राहावी व नागरिकांना दर्जेदार सुविधा मिळाव्यात, यासाठी प्रशासनाने तात्काळ दखल घेणे गरजेचे असल्याची भावना ग्रामस्थांत व्यक्त होत आहे.

Previous Post

पाथर्डी तालुक्यात भीषण अपघातात होमगार्ड जवानासह आईचा जागीच मृत्यू

Next Post

साकळीमध्ये बोगस केळी विमा घोटाळ्याची चर्चा तापली; शेतकरी संतप्त  सूत्रधार कोण? चौकशीची मागणी तीव्र

Next Post

साकळीमध्ये बोगस केळी विमा घोटाळ्याची चर्चा तापली; शेतकरी संतप्त  सूत्रधार कोण? चौकशीची मागणी तीव्र

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

परसाडे येथे आदिवासी तडवी- भिल समाजाचा सामुहिक विवाह सोहळा संपन्न

April 16, 2026

सूर्य कोपला, महाराष्ट्र तापला, पुढील काही दिवस उष्णतेची लाट…मुंबईत ३५ तर अहिल्यानगर, नागपूरमध्ये ४१ अंश तापमान

April 16, 2026

राहुरी विधानसभा मतदारसंघामध्ये मनाई आदेश जारी;जिल्हाधिकारी डॉ. पंकज आशिया म्हणाले….

April 16, 2026

साकळी येथे विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची 135 वी जयंती उत्साहात साजरी

April 15, 2026

शेठ ला. ना. सा.विद्यालयात विश्वरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी जळगाव येथील शिक्षण प्रसारक मंडळ संचालित शेठ ला.ना. सा.विद्यालयातील भैय्यासाहेब गंधे सभागृहात

April 15, 2026

कासोद्यात पोलिसांची धडाकेबाज कामगिरी ‘ऑपरेशन हातभट्टी १२०० लिटर अवैध दारू रसायनाचा जागेवरच केला नाश.

April 12, 2026
Hello Batmidar

© 2025 Powered by ContentOcean Infotech..

No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • देश-विदेश
  • जळगाव
  • धुळे
  • नंदुरबार
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • सामाजिक

© 2025 Powered by ContentOcean Infotech..