
उपसंपादक :- मिलिंद जंजाळे
महाराष्ट्र शासनाच्या महसूल व वन विभागाच्या दि. १८ फेब्रुवारी २०२५ च्या शासन निर्णयानुसार राबविण्यात येणाऱ्या गतिमान प्रशासन व आपत्कालीन व्यवस्थेच्या बळकटीकरण योजनेअंतर्गत “छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबीर” दिनांक १७ एप्रिल २०२६ रोजी किंनगाव (ता. यावल) येथे मोठ्या उत्साहात व शिस्तबद्ध पद्धतीने पार पडले.
या शिबिराचे उद्घाटन मा. तहसीलदार, यावल श्रीमती मोहनमाला नाझीरकर यांच्या हस्ते करण्यात आले. कार्यक्रमास विविध शासकीय विभागांचे अधिकारी, तालुका स्तरावरील कर्मचारी, स्थानिक लोकप्रतिनिधी तसेच ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
या शिबिरातून नागरिकांना थेट लाभ देत प्रशासनाने ‘आपल्या दारी सेवा’ ही संकल्पना प्रत्यक्षात उतरवली. विविध योजनांचा लाभ एकाच ठिकाणी उपलब्ध करून देण्यात आल्याने नागरिकांमध्ये समाधानाचे वातावरण दिसून आले.
शिबिरातील ठळक कामगिरी :
जिवंत सातबारा वाटप
एकूण वारस नोंदी : 114
प्रातिनिधिक वाटप : 21
उत्पन्न दाखले वाटप – 9
शिधापत्रिका वाटप – 13
जात प्रमाणपत्र वाटप – 03
तुकडा शेरा कमी करण्याची कारवाई (७/१२ उतारा)
एकूण तुकडा सातबारा : 882
पात्र प्रकरणे : 694प्रातिनिधिक वाटप 17अधिवास (Domicile) व नॉन-क्रीमीलेअर प्रमाणपत्र – 05, विशेष अर्थसाहाय योजना लाभार्थी – 08 लक्ष्मी मुक्ती सातबारा वाटप – 01, आदिवासी खातेदार नोंदी – 04, घरकुल लाभ – 02 आयुष्मान भारत कार्ड (आरोग्य विभाग) – 16,ट्रॅक्टर वाटप – 01
प्रशासनाची प्रभावी कामगिरी
या शिबिरातून महसूल, आरोग्य, सामाजिक न्याय, आदिवासी विकास आदी विविध विभागांनी एकत्रितपणे काम करत नागरिकांच्या प्रलंबित प्रकरणांना तत्काळ न्याय देण्याचा प्रयत्न केला. विशेष म्हणजे, तुकडा सातबारा प्रकरणांमध्ये मोठ्या प्रमाणात निपटारा करण्यात आल्याने शेतकऱ्यांना दिलासा मिळाला.
नागरिकांकडून समाधान व्यक्त
शिबिरात लाभ घेतलेल्या नागरिकांनी प्रशासनाच्या या उपक्रमाचे कौतुक करत अशा शिबिरांचे आयोजन सातत्याने व्हावे, अशी अपेक्षा व्यक्त केली.
एकूणच, “महाराजस्व समाधान शिबीर” हे प्रशासन आणि नागरिक यांच्यातील दरी कमी करणारे ठरले असून, शासन सेवा गावपातळीवर पोहोचविण्याचा हा एक प्रभावी प्रयत्न असल्याचे चित्र दिसून आले.






