
“हा केवळ विसर नव्हे, तर संविधानाचा अवमान” – आंबेडकरी संघटनांचा थेट आरोप
राज्यभर जाहीर निषेध, आंदोलनाचा इशारा
उपसंपादक:-मिलिंद जंजाळे
भारताच्या संविधानाचे शिल्पकार, विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांवर उभ्या असलेल्या देशात, प्रजासत्ताक दिनासारख्या पवित्र दिवशीच त्यांचे नाव न घेणे ही गंभीर बाब ठरत असून नाशिक येथे पालक मंत्री गिरीश महाजन यांनी केलेल्या या कृतीमुळे संपूर्ण महाराष्ट्रात संतापाची लाट उसळली आहे.
नाशिक येथे आयोजित अधिकृत प्रजासत्ताक दिनाच्या कार्यक्रमात मंत्री गिरीश महाजन यांनी प्रदीर्घ भाषण केले. मात्र, संविधान निर्माते डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे नाव एकदाही न घेता भाषण संपवले. यावर कार्यक्रमस्थळी उपस्थित असलेल्या नागरिकांमध्ये, कर्मचारी वर्गात व विशेषतः आंबेडकरी विचारधारेशी संबंधित संघटनांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त करण्यात आली.
“हा अपघात नाही, तर मानसिकता आहे” – आंबेडकरी संघटनांचा आरोप
या घटनेनंतर राज्यभरातील विविध आंबेडकरी संघटना, सामाजिक कार्यकर्ते आणि संविधानप्रेमी नागरिकांनी मंत्री महाजन यांचा जाहीर निषेध सुरू केला आहे. अनेक ठिकाणी निषेध सभा, घोषणाबाजी आणि निवेदने देण्यात येत आहेत.
संघटनांचे म्हणणे आहे की,
“प्रजासत्ताक दिन म्हणजे संविधानाचा उत्सव! आणि संविधान म्हणजे बाबासाहेब! त्यांचे नाव न घेणे म्हणजे देशाच्या आत्म्याचा अपमान आहे.”
सोशल मीडियावरही संतापाचा उद्रेकही घटना समोर येताच सोशल मीडियावर असे हॅशटॅग ट्रेंड होऊ लागले. हजारो नागरिकांनी संतप्त प्रतिक्रिया नोंदवत मंत्री महाजन यांनी जाहीर माफी मागावी अशी मागणी केली आहे.
राज्यभर आंदोलनाचा इशारा
आंबेडकरी संघटनांनी स्पष्ट इशारा दिला आहे की,
जर मंत्री गिरीश महाजन यांनी तात्काळ जाहीर माफी मागितली नाही, तर राज्यव्यापी आंदोलन, रास्ता रोको, निदर्शने आणि तीव्र आंदोलन छेडण्यात येईल.
राजकीय वर्तुळातही खळबळ
या घटनेमुळे राजकीय वर्तुळातही खळबळ उडाली असून विरोधी पक्षांनीही सरकारवर जोरदार टीका केली आहे.
“संविधानाचा सन्मान न करणाऱ्यांना सत्तेत राहण्याचा अधिकार नाही,” असा थेट हल्लाबोल करण्यात आला आहे.







