Hello Batmidar
  • Home
  • ताज्या बातम्या
  • देश-विदेश
  • जळगाव
  • धुळे
  • नंदुरबार
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • देश-विदेश
  • जळगाव
  • धुळे
  • नंदुरबार
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
Hello Batmidar
No Result
View All Result

विद्यार्थ्यांच्या शिक्षणाशी खेळ करणाऱ्या बेशिस्त शिक्षकांवर कडक कारवाईची मागणी तीव्र; मुख्यकार्यकारी अधिकाऱ्यांनी तातडीने मोठे पाऊल उचलावे नागरिकांचा सूर

Editor Hello Batmidar by Editor Hello Batmidar
November 23, 2025
in शैक्षणिक
0

उपसंपादक :- मिलिंद जंजाळे
यावल तालुक्यातील आदिवासी बहुल भागातील जिल्हा परिषद शाळांमध्ये अलीकडे गंभीर निष्काळजीपणा समोर आलेला आहे. अनेक शाळा दररोज बंद आढळत असून, नियुक्त शिक्षक गायब असल्याचे चित्र चिंताजनक आहे. या निष्काळजीपनामुळे शेकडो आदिवासी मुलांचे शिक्षण बिघडत असून, त्यांच्या उज्ज्वल भविष्यासमोर मोठा प्रश्नचिन्ह उभा झाला आहे.
स्थानिकांच्या म्हणण्यानुसार, शाळा असतांनाही काही शिक्षक नियमितपणे हजेरी नोंदवत नाहीत. हे शिक्षक नेमके कुठे दांड्या मारत आहेत? कोणत्या राजकीय गटांचा हात या शिक्षकांवर आहे का? अशा अनेक शंका नागरिकांच्या मनात घर करत आहेत. शिक्षण विभागाचे विस्तार अधिकारी मात्र याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत असल्याचा आरोपही ग्रामस्थांनी केला आहे.
शिक्षण हा आदिवासी मुलांचा अनमोल हक्क… पण त्याच हक्काशी खेळ करणारी ही शिक्षणव्यवस्थेतील ढिसाळ मानसिकता लोकांमध्ये संताप भडकवत आहे. यामुळे गावोगावी आता शिक्षकांच्या अनियमिततेविरोधात आवाज बुलंद होत असून, “अशा बेशिस्त शिक्षकांवर तातडीने कडक कारवाई झालीच पाहिजे” अशी मागणी तीव्र स्वरूप धारण करत आहे.
यावर ग्रामस्थांनी स्पष्टपणे सांगितले की, जिल्हा परिषदेचे मुख्यकार्यकारी अधिकारी (CEO) यांनी या सर्व प्रकरणाचा गांभीर्याने तातडीने विचार करून मोठे पाऊल उचलणे अत्यावश्यक आहे. दोषी शिक्षकांच्या चौकशीसह तात्काळ निलंबनासारखी कठोर शिस्तभंग कारवाई झाली नाही, तर पालक व स्थानिक नागरिक तीव्र आंदोलन उभारू शकतात असे काही सुज्ञ नागरिकांनकडून बोलले जात आहे.
आदिवासी मुलांचे भविष्य धोक्यात घालणाऱ्या या शिक्षणातील बेफिकीरीला आता पूर्णविराम देण्याची वेळ आली आहे, असा निर्धार सर्वसामान्य नागरिकांनी व्यक्त केला आहे. शिक्षण व्यवस्थेत पारदर्शकता आणि जबाबदारीची भावना रुजवण्यासाठी जिल्हा प्रशासनाने तातडीने पुढाकार घेणे गरजेचे असल्याची व्यापक मागणी केली जात आहे.

Previous Post

नगर शहरात वाहतूक कोंडीचा कळस; खासदार नीलेश लंके यांनी काय केले…

Next Post

नगराध्यक्ष पदासाठी अघोरी विद्दयेचा चा आधार घेणाऱ्या उमेदवार कोण

Next Post

नगराध्यक्ष पदासाठी अघोरी विद्दयेचा चा आधार घेणाऱ्या उमेदवार कोण

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

डॉ .बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव समितीच्या अध्यक्षपदी श्री .विलास नाना साळवे यांची निवड

March 2, 2026

पारंपरिक वाद्य कालबाहय वादकांवर उपासमारीची वेळ…? तुतारी वाद्य नामशेष होण्याच्या मार्गावर..

March 2, 2026

मध्यपूर्वेत तणाव वाढला; भारत सरकारकडून सुरक्षा ॲडव्हायझरीमहाराष्ट्रातील नागरिकांनाही सतर्कतेचे आवाहन

March 1, 2026

धनंजय मुंडेंच्या केसाला धक्का लागला तरी खेळ खल्लास; आमदार सुरेश धससह जरांगेंना मुंडेंच्या समर्थकाची खुलेआम धमकी

March 1, 2026

आश्रम शाळा मगरूळ येथे गंभीर अनियमितता; विद्यार्थी अनुपस्थित, मुख्याध्यापक गैरहजर

March 1, 2026

‘दैनिक हॅलो बातमीदार’च्या दणक्याने कोरपावलीतील बोगस डॉक्टरचे धाबे दणाणले; प्रशासनाकडून अखेर नोटीस!

March 1, 2026
Hello Batmidar

© 2025 Powered by ContentOcean Infotech..

No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • देश-विदेश
  • जळगाव
  • धुळे
  • नंदुरबार
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • सामाजिक

© 2025 Powered by ContentOcean Infotech..