Hello Batmidar
  • Home
  • ताज्या बातम्या
  • देश-विदेश
  • जळगाव
  • धुळे
  • नंदुरबार
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • देश-विदेश
  • जळगाव
  • धुळे
  • नंदुरबार
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
Hello Batmidar
No Result
View All Result

साकळी ग्रामपंचायतीत खळबळ! उपसरपंचांचा कोऱ्या कागदावरील अंगठ्याच्या गैरवापराचा गंभीर आरोपबनावट राजीनाम्याचा संशय गटविकास अधिकाऱ्यांकडे तक्रार अर्ज दाखल

Editor Hello Batmidar by Editor Hello Batmidar
December 26, 2025
in क्राईम
0

उपसंपादक :-मिलिंद जंजाळे
साकळी ग्रामपंचायतीत लोकशाहीला काळीमा फासणारा धक्कादायक प्रकार उघडकीस आला असून, ग्रामपंचायतीच्या उपसरपंच श्रीमती खान नूर तस्लिम खान यांनी कोऱ्या कागदावर घेतलेल्या अंगठ्याच्या ठशाचा गैरवापर करून बनावट राजीनामा तयार होण्याची ठाम शंका व्यक्त केली आहे.
या प्रकरणी त्यांनी ग्रामपंचायत साकळी तसेच यावल पंचायत समितीचे गटविकास अधिकारी यांच्याकडे लेखी तक्रार अर्ज दाखल करून प्रशासनाचे लक्ष वेधले आहे.
तक्रार अर्जात उपसरपंच खान यांनी स्पष्ट शब्दांत नमूद केले आहे की,
मी आजपर्यंत उपसरपंच पदाचा कोणताही लेखी अथवा तोंडी राजीनामा दिलेला नाही. माझ्या संमतीशिवाय व मला कोणतीही माहिती न देता कोऱ्या कागदावर विश्वासाने घेतलेल्या अंगठ्याच्या ठशाचा फसवणुकीच्या व बेकायदेशीर पद्धतीने वापर होण्याची दाट शक्यता आहे.
उपसरपंच खान यांनी पुढे म्हटले आहे की,माझे सर्व व्यवहार अंगठ्याच्या ठशावरच चालतात. याचाच गैरफायदा घेत पूर्वी वेगळ्या कारणासाठी घेतलेल्या कोऱ्या कागदावरील अंगठ्याच्या ठशावर नंतर राजीनाम्याचा मजकूर टाकून बनावट दस्तऐवज तयार केला जाऊ शकतो.हा प्रकार अत्यंत गंभीर, फसवणूक करणारा व पूर्णतः बेकायदेशीर असल्याचे त्यांनी ठामपणे नमूद केले आहे. भविष्यात माझ्या नावाने दाखल होणारा कोणताही राजीनामा माझ्या इच्छेविरुद्ध असून तो अमान्य व अवैध समजावा, अशी स्पष्ट मागणी त्यांनी अर्जात केली आहे. माझी प्रत्यक्ष उपस्थिती, ओळख पडताळणी व लेखी पुष्टी घेतल्याशिवाय कोणतीही कार्यवाही करू नये, असेही त्यांनी प्रशासनाला बजावले आहे. तसेच दिलेल्या तक्रार अर्जाची ग्रामपंचायत दप्तरी तात्काळ नोंद घेऊन भविष्यात कोणताही वाद निर्माण होऊ नये, अशी मागणी करण्यात आली आहे.
या धक्कादायक प्रकरणामुळे साकळी ग्रामपंचायतीच्या कारभारावर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून, लोकप्रतिनिधींच्या अंगठ्याच्या ठशांचा गैरवापर होत असेल तर सामान्य नागरिक किती सुरक्षित आहेत? असा संतप्त सवाल ग्रामस्थांमधून उपस्थित होत आहे.
आता प्रशासन काय भूमिका घेते? दोषींवर कारवाई होणार की प्रकरण दाबले जाणार?
याकडे संपूर्ण तालुक्याचे लक्ष लागले आहे.

Previous Post

अशोक शिंदे यांना ‘गंगाई बाबाजी राज्यस्तरीय आदर्श पत्रकार पुरस्कार’ जाहीर

Next Post

ग्रामपंचायत अडावदमध्ये ४५ हजारांचा उघड भ्रष्टाचार? ग्रामपंचायत कर्मचाऱ्यालाच ठेका देऊन सरपंच ग्रामसेवकांचा संगनमताचा आरोप

Next Post

ग्रामपंचायत अडावदमध्ये ४५ हजारांचा उघड भ्रष्टाचार? ग्रामपंचायत कर्मचाऱ्यालाच ठेका देऊन सरपंच ग्रामसेवकांचा संगनमताचा आरोप

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

साकळी ग्रामपंचायतीच्या खर्चावर संशयाचे सावट!डसबिन वाटपाच्या नावाखाली नेमका कुठून झाला खर्च? माजी सदस्य सैय्यद तैय्यब सैय्यद ताहेर यांचा जाब

January 15, 2026

जळगाव मनपा रणसंग्राम: राजकीय दबावाला न जुमानता ‘स्वराज्य शक्ती सेने’चे १० निष्ठावंत शिलेदार मैदानात

January 14, 2026

ज्योती विद्या मंदिर सांगवी बुद्रुक येथे राष्ट्रीय युवा दिनानिमित्त धावण्याची स्पर्धा

January 14, 2026

साकळीत घाणीचे साम्राज्य!गावातील गटारी तुंबल्या, दुर्गंधीने नागरिक त्रस्तग्रामपंचायत प्रशासनाचे अक्षम्य दुर्लक्ष आरोग्य धोक्यात

January 14, 2026

मतदानापूर्वीच अजित पवारांना दणका, राजकीय सल्लगाराच्या कार्यालयावर छापा

January 14, 2026

साकळीतील अंगणवाडीत मुलांच्या पोषण आहारात आळी!प्रशासनाचा ढिसाळ कारभार ठेकेदार, सेविका व मदतनीसांवर कठोर कारवाईची मागणीअन्यथा तीव्र आंदोलन छेडणार

January 14, 2026
Hello Batmidar

© 2025 Powered by ContentOcean Infotech..

No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • देश-विदेश
  • जळगाव
  • धुळे
  • नंदुरबार
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • सामाजिक

© 2025 Powered by ContentOcean Infotech..