
आज सुप्रीम कोर्टाने महाराष्ट्रातील नगरपरिषद आणि नगरपंचायत निवडणुकांबाबत महत्त्वाचा निर्णय दिला. काही लोकांनी निवडणुका थांबवण्याची मागणी केली होती, पण कोर्टाने ती मागणी नाकारली.
कोर्टाने स्पष्ट सांगितले की निवडणुका वेळापत्रकानुसारच होतील. कोणतीही स्थगिती देण्यात येणार नाही. उमेदवारांचे अर्ज, प्रचार, मतदान — सर्व प्रक्रिया जशा जाहीर केल्या आहेत तशाच चालू राहतील.
निवडणुकांमध्ये काही ठिकाणी ५०% पेक्षा जास्त आरक्षण असल्याबाबत तक्रारी करण्यात आल्या होत्या. यावर कोर्टाने सांगितले की हा मुद्दा पुढे तपासला जाईल, पण निवडणुका थांबवण्यासाठी हा कारण पुरेसा नाही.
ज्या जागांवर आरक्षणाबाबत वाद आहे, त्या जागांचे अंतिम निकाल कोर्टाच्या पुढील निर्णयावर अवलंबून राहतील.
या प्रकरणाची पुढील सुनावणी 21 जानेवारी 2026 रोजी होणार आहे.
एकूणात — संपूर्ण महाराष्ट्रात स्थानिक निवडणुका थांबणार नाहीत आणि ठरलेल्या वेळेनुसारच पार पडतील.
—







