Hello Batmidar
  • Home
  • ताज्या बातम्या
  • देश-विदेश
  • जळगाव
  • धुळे
  • नंदुरबार
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • देश-विदेश
  • जळगाव
  • धुळे
  • नंदुरबार
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
Hello Batmidar
No Result
View All Result

विद्यार्थ्यांच्या शिक्षणाशी खेळ करणाऱ्या बेशिस्त शिक्षकांवर कडक कारवाईची मागणी तीव्र; मुख्यकार्यकारी अधिकाऱ्यांनी तातडीने मोठे पाऊल उचलावे नागरिकांचा सूर

Editor Hello Batmidar by Editor Hello Batmidar
November 23, 2025
in शैक्षणिक
0

उपसंपादक :- मिलिंद जंजाळे
यावल तालुक्यातील आदिवासी बहुल भागातील जिल्हा परिषद शाळांमध्ये अलीकडे गंभीर निष्काळजीपणा समोर आलेला आहे. अनेक शाळा दररोज बंद आढळत असून, नियुक्त शिक्षक गायब असल्याचे चित्र चिंताजनक आहे. या निष्काळजीपनामुळे शेकडो आदिवासी मुलांचे शिक्षण बिघडत असून, त्यांच्या उज्ज्वल भविष्यासमोर मोठा प्रश्नचिन्ह उभा झाला आहे.
स्थानिकांच्या म्हणण्यानुसार, शाळा असतांनाही काही शिक्षक नियमितपणे हजेरी नोंदवत नाहीत. हे शिक्षक नेमके कुठे दांड्या मारत आहेत? कोणत्या राजकीय गटांचा हात या शिक्षकांवर आहे का? अशा अनेक शंका नागरिकांच्या मनात घर करत आहेत. शिक्षण विभागाचे विस्तार अधिकारी मात्र याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत असल्याचा आरोपही ग्रामस्थांनी केला आहे.
शिक्षण हा आदिवासी मुलांचा अनमोल हक्क… पण त्याच हक्काशी खेळ करणारी ही शिक्षणव्यवस्थेतील ढिसाळ मानसिकता लोकांमध्ये संताप भडकवत आहे. यामुळे गावोगावी आता शिक्षकांच्या अनियमिततेविरोधात आवाज बुलंद होत असून, “अशा बेशिस्त शिक्षकांवर तातडीने कडक कारवाई झालीच पाहिजे” अशी मागणी तीव्र स्वरूप धारण करत आहे.
यावर ग्रामस्थांनी स्पष्टपणे सांगितले की, जिल्हा परिषदेचे मुख्यकार्यकारी अधिकारी (CEO) यांनी या सर्व प्रकरणाचा गांभीर्याने तातडीने विचार करून मोठे पाऊल उचलणे अत्यावश्यक आहे. दोषी शिक्षकांच्या चौकशीसह तात्काळ निलंबनासारखी कठोर शिस्तभंग कारवाई झाली नाही, तर पालक व स्थानिक नागरिक तीव्र आंदोलन उभारू शकतात असे काही सुज्ञ नागरिकांनकडून बोलले जात आहे.
आदिवासी मुलांचे भविष्य धोक्यात घालणाऱ्या या शिक्षणातील बेफिकीरीला आता पूर्णविराम देण्याची वेळ आली आहे, असा निर्धार सर्वसामान्य नागरिकांनी व्यक्त केला आहे. शिक्षण व्यवस्थेत पारदर्शकता आणि जबाबदारीची भावना रुजवण्यासाठी जिल्हा प्रशासनाने तातडीने पुढाकार घेणे गरजेचे असल्याची व्यापक मागणी केली जात आहे.

Previous Post

नगर शहरात वाहतूक कोंडीचा कळस; खासदार नीलेश लंके यांनी काय केले…

Next Post

नगराध्यक्ष पदासाठी अघोरी विद्दयेचा चा आधार घेणाऱ्या उमेदवार कोण

Next Post

नगराध्यक्ष पदासाठी अघोरी विद्दयेचा चा आधार घेणाऱ्या उमेदवार कोण

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

साकळी ग्रामपंचायतीच्या खर्चावर संशयाचे सावट!डसबिन वाटपाच्या नावाखाली नेमका कुठून झाला खर्च? माजी सदस्य सैय्यद तैय्यब सैय्यद ताहेर यांचा जाब

January 15, 2026

जळगाव मनपा रणसंग्राम: राजकीय दबावाला न जुमानता ‘स्वराज्य शक्ती सेने’चे १० निष्ठावंत शिलेदार मैदानात

January 14, 2026

ज्योती विद्या मंदिर सांगवी बुद्रुक येथे राष्ट्रीय युवा दिनानिमित्त धावण्याची स्पर्धा

January 14, 2026

साकळीत घाणीचे साम्राज्य!गावातील गटारी तुंबल्या, दुर्गंधीने नागरिक त्रस्तग्रामपंचायत प्रशासनाचे अक्षम्य दुर्लक्ष आरोग्य धोक्यात

January 14, 2026

मतदानापूर्वीच अजित पवारांना दणका, राजकीय सल्लगाराच्या कार्यालयावर छापा

January 14, 2026

साकळीतील अंगणवाडीत मुलांच्या पोषण आहारात आळी!प्रशासनाचा ढिसाळ कारभार ठेकेदार, सेविका व मदतनीसांवर कठोर कारवाईची मागणीअन्यथा तीव्र आंदोलन छेडणार

January 14, 2026
Hello Batmidar

© 2025 Powered by ContentOcean Infotech..

No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • देश-विदेश
  • जळगाव
  • धुळे
  • नंदुरबार
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • सामाजिक

© 2025 Powered by ContentOcean Infotech..