
उपसंपादक मन्सूर तडवी
चोपडा तालुक्यातील मोहरद बिडगाव कुंडयापाणी पानशेवडी चांदण्यात तलाव या आदिवासी परिसरात बऱ्याच शेतकऱ्यांनी यावर्षी केळी लागवड मोठ्या प्रमाणात केलेली असून आता माल निघायला सुरुवात होत आहे त्यातच केळी मालाला या वर्षी पुरेसा भाव नाही त्यात खराब रस्त्यामुळे शेतकऱ्यांना माल बाहेर काढण्यास काटेची कसरत करावी लागत आहे मागच्या यावर्षी रिमझिम पावसामुळे गाळरस्त्यात खूप गारा चिखल साचुन वाहनांना अडथळा येत आहे जर एक ते दीड किलोमीटर अंतरावर माल काढून मजुरांना डोक्यावरून केळी चे घड आणावे लागतील तर त्याची वाहतूक ही शेतकऱ्याला परवडेबल नाही लागलेला खर्च सुद्धा निघत नाही मागच्या वर्षी केळीला अधिक भाव असल्यामुळे शेतकऱ्यांना काहीसा फरक जाणवलेला नव्हता मोहरद ते खंडने चांदण्यातलाव या रस्त्याचे काम मा.आमदार कार्यसम्राट चंद्रकांत जी सोनवणे यांच्या प्रयत्नातून सहा ते सात किलोमीटर डांबरीकरण झालेले असून त्या परिसरात केळी लागवड ही अधिक असून बऱ्याच शेतकऱ्यांच्या बांधावर गाडी लागत आहे या रस्त्याच्या प्रश्न सुटलेला आहे तसेच आता मोहरद ते पानशेवडी ह्या रस्त्याची परिस्थिती खूप बिकट(खराब) झालेली आहे या मार्गावर रस्त्यातच ३०,३५ वर्ष अगोदर पाझर तलाव बांधण्यात आले असून धरणाच्या उजव्या बाजूने पर्यायी मार्ग काढला होता पण तो रस्ता बंद करण्यात आला आहे तरी शासनाकडून तो रस्ता मोकळा करून रस्त्याची रुंदीकरण डांबरीकरण करण्यात यावा अशी शेतकऱ्यांची मागणी होत आहे पानशेवडीरोड मार्गाने बैलगाडी वर माल आणताना सुद्धा खूप त्रास होत आहे तर केळीची वाहतूक कशी होईल खंडणे चांदण्यातलाव पानशेवडी हे शिवार पोखरा योजनेत समाविष्ट आहेत तसेच वडती परिसरात पण खराब रस्त्यांची खूप बिकट परिस्थिती झालेली आहे ते पण प्रश्न सोडविण्यात यावे







