
हॅलो बातमीदार –
राहुरी तालुका / प्रविण पाळंदे
डॉ .बाबासाहेब आंबेडकर यांची 135 व्या जयंतीनिमित्त राहुरी शहरातील राजवाडा परिसरात असणाऱ्या जय भीम मित्रमंडळाच्या वतीने जयंती नियोजनाचे आयोजन करण्यात आले होते .
सदर नियोजन बैठकीमध्ये डॉ .बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती उत्सव भव्य दिव्य व शिस्तबद्ध पद्धतीने साजरा करण्याचा निर्णय घेण्यात आला .
सदर नियोजन बैठकीमध्ये जयंती उत्सव समितीच्या अध्यक्षपदी राहुरी तालुका आरपीआयचे तालुकाध्यक्ष श्री .विलास नाना साळवे यांचीअध्यक्षपदी तर उपाध्यक्षपदी श्री .पिंटू साळवे .कार्याध्यक्षपदी श्री .दीपक रामजी साळवे .खजिनदारपदी श्री .दादू साळवे यांची सर्वनामते निवड करण्यात आली .
यावेळी जय भीम मित्र मंडळाचे मार्गदर्शक राहुरी नगरपालिकेचे विद्यमान नगरसेवक व विरोधी पक्षनेते श्री .अरुण साळवे नियोजन बैठकीमध्ये बोलताना म्हणाले की यंदाचा डॉ .बाबासाहेब आंबेडकर जयंती महोत्सव समाज भूकव प्रेरणादायी स्वरूपात साजरा करण्याचा संकल्प करण्यात येणार असून यावर्षी यंदा पाच दिवस विविध कार्यक्रमाची रेलचेल राहणार आहे यामध्ये सांस्कृतिक कार्यक्रम समाज जागृती उपक्रम बौद्ध धम्म वाचन प्रभात फेरी व्याख्याने व स्पर्धेचा समावेश असणार असून सर्वांनी मतभेद बाजूला ठेवून एकजुटीने उस्तव साजरा करावा असे आव्हान नगरसेवक श्री .अरुण साळवे यांनी मंडळाच्या कार्यकर्त्याला केले आहे
यावेळी बैठकीस परिसरातील नगरसेवक माजी नगरसेवक तरुण कार्यकर्ते महिला मंडळ जय भीम मित्रमंडळाची कार्यकर्ते व आंबेडकरी चळवळीचे सदस्य उपस्थित होते .






