Hello Batmidar
  • Home
  • ताज्या बातम्या
  • देश-विदेश
  • जळगाव
  • धुळे
  • नंदुरबार
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • देश-विदेश
  • जळगाव
  • धुळे
  • नंदुरबार
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
Hello Batmidar
No Result
View All Result

जळगाव मनपा रणसंग्राम: राजकीय दबावाला न जुमानता ‘स्वराज्य शक्ती सेने’चे १० निष्ठावंत शिलेदार मैदानात

Editor Hello Batmidar by Editor Hello Batmidar
January 14, 2026
in राजकीय
0

“गद्दारांना जागा दाखवा आणि ‘हिरा’ चमकवा” राष्ट्रीय अध्यक्षा करुणाताई मुंडे यांचे जळगावकरांना जाहीर आवाहन.
​ *जळगाव प्रतिनिधी*
जळगाव महानगरपालिका निवडणुकीच्या अंतिम टप्प्यात राजकीय घडामोडींना प्रचंड वेग आला आहे. साम-दाम-दंड-भेदाचा वापर करून विरोधकांनी कितीही दबाव आणला, तरी ‘स्वराज्य शक्ती सेना’ डगमगलेली नाही. पक्षाने दिलेल्या १२ उमेदवारांपैकी शेवटच्या क्षणी दोन उमेदवारांनी दबावाला बळी पडून माघार घेतली असली, तरी उरलेले १० निष्ठावंत वाघ निवडणुकीच्या रिंगणात ठामपणे उभे आहेत. या सर्व १० उमेदवारांना प्रचंड मतांनी विजयी करण्याचे आवाहन स्वराज्य शक्ती सेनेच्या संस्थापिका आणि राष्ट्रीय अध्यक्षा सौ. करुणाताई धनंजय मुंडे यांनी केले आहे.
*​दबावाला भीक नाही, संघर्षाला साथ*

स्वराज्य शक्ती सेनेने जळगाव महानगरपालिकेत अधिकृतपणे १२ उमेदवार दिले होते. मात्र, प्रस्थापित पक्षांनी या उमेदवारांवर प्रचंड दबावतंत्राचा वापर केला. या दबावामुळे शेवटच्या दोन दिवसांत दोन उमेदवारांनी इतर पक्षाला पाठिंबा दिला. मात्र, या फोडाफोडीच्या राजकारणाला चोख प्रत्युत्तर देत पक्षाचे १० उमेदवार आजही जनतेच्या हक्कासाठी मैदानात आहेत.

​ *करुणाताई मुंडे यांचे आवाहन:*

यावेळी बोलताना सौ. करुणाताई मुंडे म्हणाल्या की, “स्वराज्य शक्ती सेनेचा लढा हा अन्यायाविरुद्ध आणि सर्वसामान्यांच्या हक्कासाठी आहे. आमच्या उमेदवारांवर दबाव आणून काहींनी आमची ताकद कमी करण्याचा प्रयत्न केला, पण माझे १० शिलेदार आजही जनतेसोबत प्रामाणिक आहेत. जळगावच्या विकासासाठी आणि भ्रष्टाचाराला गाडून टाकण्यासाठी मतदारांनी आता ठाम राहिले पाहिजे. जे दबावाला बळी पडले त्यांचा विचार करण्यापेक्षा जे तुमच्यासाठी लढायला उभे आहेत त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहा.
​
“जळगावच्या उज्ज्वल भविष्यासाठी आणि खऱ्या परिवर्तनासाठी स्वराज्य शक्ती सेनेच्या सर्व १० उमेदवारांच्या नावासमोरील ‘हिरा’ या चिन्हाचे बटन दाबून त्यांना प्रचंड मतांनी विजयी करा,” असे आवाहन करुणाताई मुंडे यांनी केले आहे.
​निवडणुकीच्या शेवटच्या टप्प्यात स्वराज्य शक्ती सेनेने घेतलेल्या या आक्रमक भूमिकेमुळे विरोधकांचे धाबे दणाणले असून, मतदार आता ‘हिरा’ चिन्हाला पसंती देतील, असा विश्वास पक्षाने व्यक्त केला आहे.

Previous Post

ज्योती विद्या मंदिर सांगवी बुद्रुक येथे राष्ट्रीय युवा दिनानिमित्त धावण्याची स्पर्धा

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

जळगाव मनपा रणसंग्राम: राजकीय दबावाला न जुमानता ‘स्वराज्य शक्ती सेने’चे १० निष्ठावंत शिलेदार मैदानात

January 14, 2026

ज्योती विद्या मंदिर सांगवी बुद्रुक येथे राष्ट्रीय युवा दिनानिमित्त धावण्याची स्पर्धा

January 14, 2026

साकळीत घाणीचे साम्राज्य!गावातील गटारी तुंबल्या, दुर्गंधीने नागरिक त्रस्तग्रामपंचायत प्रशासनाचे अक्षम्य दुर्लक्ष आरोग्य धोक्यात

January 14, 2026

मतदानापूर्वीच अजित पवारांना दणका, राजकीय सल्लगाराच्या कार्यालयावर छापा

January 14, 2026

साकळीतील अंगणवाडीत मुलांच्या पोषण आहारात आळी!प्रशासनाचा ढिसाळ कारभार ठेकेदार, सेविका व मदतनीसांवर कठोर कारवाईची मागणीअन्यथा तीव्र आंदोलन छेडणार

January 14, 2026

नगरमध्ये महानगरपालिका निवडणूक प्रचारात ‘द ग्रेट खली‘ची एंट्री….

January 13, 2026
Hello Batmidar

© 2025 Powered by ContentOcean Infotech..

No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • देश-विदेश
  • जळगाव
  • धुळे
  • नंदुरबार
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • सामाजिक

© 2025 Powered by ContentOcean Infotech..