
विशेष बातमी प्रशांत बाफना
कडक शिस्तीचे आणि परिणामकारक प्रशासनासाठी ओळख असलेले आयएएस अधिाकरी तुकाराम मुंडे यांची सात महिन्यात पुन्हा बदली झाली आहे. ऑगस्ट 2025 मध्ये त्यांना अपंग कल्याण विभागचे सचिव म्हणून नेमण्यात आले होते, तर आता त्यांची बदली आपत्ती व्यवस्थापन, पुनर्वसन, महसूल व वन विभागाचे सचिव या पदावर करण्यात आली. 29 वर्षात 24 वी बदली 21 वर्षाच्या कारकिर्दीत ही त्यांची 24 वी बदली असून, विविध विभागात सातत्यपूर्ण कार्यकुलतेमुळे ते महाराष्ट्र प्रशासनातील एक महत्वाचा आणि चर्चित अधिकारी बनले आहेत.
बदल्यांच्या या फेरीमध्ये इरत वरिष्इ आयएएस अधिकार्यांनाही महत्वाच्या पदावंर नेले गेले आहे. लोकेश चंद्रा ( आयएएस: आर आर 1993) महाराष्ट्र राज्या वीज वितरण कंपनीचे अध्यक्ष आणि व्यवस्थापिकय संचालक, आता मुख्यमंत्री कार्यालयात अतिरिक्त मुख्य सचिव म्हणून कार्यरत राहणार आहेत. अश्विनी भिडे (आयएएस : आर आर 1995) मुख्यमंत्री कार्यालयातील अतिरिक्त मुख्य सचिव आता महानगरपालिकेच्या आयुक्तपदी कार्यरत राहणार आहेत.
विकास चंद्र रस्तोगी ( आयएएस: आरआर 995)जे आधी कृषी व एडीएफ विभागात अतिरिक्त मुख्य सचिव होते, ते आता वित्ता विभात आर्थिक सुधारणांसाठी अतिरिक्त मुख्य सचिव झाले आहेत. परिमल सिंग (आयएएस: आरआर 2004), नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्पो प्रकल्प संचालक, आता कषी विभागाचे सचिव झाले आहेत.
विनिता वैद सिंगल (आयएएस: आरआर1996) जे आपत्ती व्यवस्थापन विभागचे मुख्य सचिव होते, त्यांनी माती व जलसंवर्धन विभागाचे प्रमुख सचिवपद सांभाळणार आहेत. लहु माळी (आयएएस: आरआर2009)शिवशाही पुनर्वसन प्रकल्प लिमिटेडचे व्यवस्थापकीय संचालक झाले आहेत. मनीक गुसाळ ( आयएएस : एससीएस 2009 आता अपंग कल्याण विभागचे सचिव म्हणून तुकारम मुंडेची जागा घेत आहेत.
प्रेरणा देभ्रतार ( आयएएस: आर आर 2010) राज्य कर विभागातील संयुक्त आयुक्त, आजा मत्स्य विभागाच्या आयुक्तपदी कार्यरत राहणार आहेत. पृथ्वीराज बी पी ( आयएएस: आरआर 20214) पुणे महानगपालिकचे अतिरिक्त आयुक्त . आता वसई विरार महानगरपालिका आयुक्त झाले आहेत. या फेरबदलांमुळे राज्य प्रशासनातील धोरणात्मक आणि कार्यात्मक भूमिका अधिक प्रभावी करण्याचा प्रयत्न सुरू असल्याचे प्रशासनानकडून सांगण्यात येत आहे






